WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board exam 2025 बोर्डाचा तो निर्णय रद्द दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board exam 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत जवळ आलेले आहेत यातच आता बोर्डाने काही मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे याचीच माहिती आपण घेणार आहोत की कुठला निर्णय आहे आणि विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये त्याचप्रमाणे शिक्षकांमध्ये एक आनंदाचे वातावरण आहे

SSC HSC board exam 2025 पूर्ण माहिती

SSC HSC board exam 2025 दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेले आहेत बोर्डाचे यावर्षी काही निर्णय हे चुकलेले आहेत कारण असेच म्हणावे लागेल बोर्डान यादी हॉल तिकीटवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख केला होता याला देखील आता विरोध झाला आणि तो निर्णय रद्द केला त्याचप्रमाणे दुसरा निर्णय होता सीसीटीव्ही प्रत्येक केंद्र हे असणे अनिवार्य आहे तो निर्णय सर्वत्र लागू झालेला आहे राज्यात कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी आणखीन एक निर्णय बोर्डाने घेतला तो म्हणजे परीक्षक केंद्रावर शिक्षकांची अदलाबदली याला राज्यभरातून विरोध झाला आणि या निर्णयालाचा थोडा बहुत स्थगिती मिळाली आहेइयत्ता दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी म्हणून पर्यवेक्षक व केंद्र संचालकांची आदलाबदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या १०० कलमी कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आला होता.

राज्यभरातून या निर्णयाचा विरोध

शिक्षक संघटनांसह शिक्षक आमदारांच्या विरोधामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तो निर्णय बदलला आहे. आता कोरोना काळ वगळून २०१८, २०१९, २०२० व २०२३ आणि २०२४ या काळातील परीक्षेवेळी ज्या केंद्रांवर गैरप्रकाराची प्रकरणे आढळली, त्या केंद्रांवरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक मात्र बदलण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

सध्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षा सुरु आहे. ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार आहे. दुसरीकडे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणार असून त्यांची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात पार पडणार आहे. दरम्यान, राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर आणि कोकण या विभागीय मंडळाअंतर्गत येणाऱ्या केंद्रांवर कोरोनाचे २०२१ व २०२२ हे दोन वर्षे वगळून २०१८ पासून झालेल्या परीक्षेत ज्या केंद्रांवर कॉपी प्रकरणे आढळली, त्या केंद्रांवर आता नवीन पर्यवेक्षक व केंद्र संचालक नेमले जाणार आहेत.

बोर्डाच्या निर्णयानुसार आता कार्यवाही

परीक्षा केंद्रांसाठी सरमिसळ पद्धत यापूर्वीच अवलंबली असून आता केंद्र संचालक व पर्यवेक्षकांची आदलाबदल करण्याचे नियोजन आहे. त्यासंदर्भातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार कार्यवाही होईल.

  • औदुंबर उकीरडे, विभागीय सचिव, पुणे मंडळ

बोर्डाच्या नव्या निर्णयानुसार…

२०१८, २०१९, २०२० व २०२३ आणि २०२४ या काळातील परीक्षेवेळी गैरप्रकार आढळलेल्या केंद्रांवर दुसऱ्या शाळांमधील केंद्र संचालक व पर्यवेक्षक नेमले जातील

फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दहावी-बारावीच्या परीक्षेत ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकाराची प्रकरणे आढळतील, त्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द केली जाईल

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष, त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा पारदर्शक तथा कॉपीमुक्त होण्यासाठी भरारी पथकांचे नियोजन करतील

माध्यमिक शिक्षणाधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने परीक्षा काळात प्रत्येक परीक्षा केंद्रांवर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत आहेत की नाहीत याची खात्री करतील

तर अशाप्रकारे आपण बघितलं की दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा संदर्भात बोर्डाने हा निर्णय देखील आता थोडासा सुलभ केलेला आहे त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी पालकांमध्ये आनंदाचे वाटप नाही दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी 9322515123या नंबर वर फोन करा किंवा प्लेस्टोर वरून नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment