RTE ADDMISSION NEWS आज आपण पाहणार की राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे कोणती धक्कादाय बातमी आहे आणि काय याच्याविषयी आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत शिक्षण क्षेत्रातून एक महत्त्वाचे आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे बघुयात संपूर्ण माहिती
RTE ADDMISSION NEWS संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक महत्त्वाचे आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे तुमचं जर विद्यार्थ्यांनी RTE अंतर्गत प्रवेश घेतला असेल तर या विषयक महत्त्वाची बातमी समोर येत आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आरटीओ प्रवेश अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत मिळत असतात आणि यामुळे आपण हाय इंग्लिश मीडियम शाळेमध्ये कुठेही प्रवेश घेऊ शकतो त्या ठिकाणी आपले सरकार पैसे भरत असतं आणि त्यामुळे आपल्याला गरीब विद्यार्थ्याला याचा फायदा होत असतो परंतु तुम्ही हा फॉर्म भरला असेल आणि त्या शाळांची जर मान्यता नसेल तर मग तो विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकतो त्यामुळे हे महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे कोणत्या शाळेंना सरकारने अपात्र ठरवलेले आणि त्यात शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं काय होणार हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय याविषयी बघुयात सविस्तर माहिती.
RTE ADDMISSION NEWS प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सुमारे 452 शाळांना शुल्क प्रतिपूर्तीसाठी अपात्र ठरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शाळांना काही कागदपत्र सादर करण्यासाठी अवधी देण्यात आला आहे. या कागदपत्रांची त्रुटी पूर्ण केल्यानंतर संबंधित शाळा पात्र होतील. मात्र, त्रुटीपूर्तता न केलेल्या शाळा अपात्र ठरणार असल्याने संबंधित शाळांच्या शुल्क प्रतिपूर्तीचा विषय निर्माण होऊ शकतो. या शाळा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम करू शकतात.
पुणे जिल्ह्यातील त्रुटी असलेल्या या 452शाळांना प्रामुख्याने वर्गमान्यता आदेश, जागा कागदपत्रे, शाळेचा पत्ता यामध्ये तफावत, फी देय वर्षातील नमुना नं 2 जोडलेला नाही अशा विविध कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आले आहे. आता दिलेल्या वेळेत जर या शाळांनी या त्रुटी पूर्ण केल्या तर त्यांना पात्र ठरवण्यात येईल.
सध्या आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु असून आतापर्यंत सर्वसाधारण यादी त्यानंतर पहिल्या प्रतिक्षा यादीतील प्रवेश निश्चित करण्यात आले. त्यानंतर आता प्रवेशाच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. दि. ८ एप्रिल १५ एप्रिल ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार असून आतापर्यंत दुसऱ्या प्रतिक्षा यादीत निवड झालेल्या ९ हजार ७२६ विद्यार्थ्यांपैकी ५५४ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. अद्याप ९ हजार १७२ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत.
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे, आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांनी काही कागदपत्र अपलोड करणे गरजेचे असते. त्यामध्ये स्वमान्यता प्रमाणपत्र, प्रथम मान्यता प्रमाणपत्र या कागदपत्रांसह विद्यार्थ्यांकडून घेतलेली ऑनलाईन फी आदी गोष्टींचा समावेश आहे. या त्रुटी ज्या शाळांच्या दिसून येत आहेत त्यांना त्रुटी पूर्ततेसाठी मुदत दिलेली आहे. संबंधित शाळांनी त्रुटीची पूर्तता करावी. त्यानंतर या शाळा शुल्क प्रतिपूर्तीसाठी पात्र होतील. – संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद, पुणे
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आरटीआय अंतर्गत शाळांना अपात्र ठरवलेला आहे आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे काय होणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर नक्की फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा