Pik vima rule change आज आपण पाहणार की राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे पिक विमा पद्धतीत आता मोठा बदल झालेला आहे यामुळे आता शेतकऱ्यांना याची माहिती असणं गरजेचं आहे नेमका पिक विमा बद्दल कोणता बदल झालेला आहे राज्य सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने काम महत्त्वाचा आहे याचीच माहिती आपणास घेणार आहोत.
Pik vima rule change संपूर्ण माहिती
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पीक विमा पद्धतीत महत्त्वाचा बदल झालेला आहे तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकार केंद्र सरकार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना अंतर्गत आर्थिक अनुदान देत असतात त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना हवामानाचा देखील मोठा फटका बसत असतो आणि त्यांच्या पिकांचे नुकसान होत असतं यामुळे पीक विमा पद्धत ही महाराष्ट्रात लागू आहे परंतु आता पिक विमा पद्धतीमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे हे बदल शेतकऱ्यांसाठी भरपूर महत्त्वाच्या आहेत शेतकरी पिक विमा ची वाट पाहत असताना सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तर बघूया की महत्त्वाचा बदल कोणता झालेला आहे आणि त्याचा शेतकऱ्यावर काय परिणाम होणार आहे सविस्तर माहिती
Pik vima rule change नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याच बैठकीत सरकारने पीकविम्यासंदर्भातही मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत पीकविमा योजनेत झालेला घोटाळा लक्षात घेता सरकारने आता या योजनेत काही महत्त्वाच्या सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी लवकरच नवी सुधारित पीकविमा योजना लागू केली जाईल. तशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
पीकविमा योजनेत नेमका बदल काय?
देवेंद्र फडणवीस यांनी पीकविमा योजनेत बदल का करण्यात आला? याची सविस्तर माहिती दिली आहे. “आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात पीकविमा योजना चालवत होते, त्या योजनेत अनेक घोटाळे पाहायला मिळाले. आपण एका रुपयात पीकविमा योजना चालू केली होती. या योजनेनंतर लाखो बोगस अर्ज आलेले पाहायला मिळाले. हजारो कोटी रुपयांचा अपव्यय होतो आहे. लोकांनी षडयंत्र केलं. त्यामुळे गरजू शेतकरी वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये, हा विचार करून पीकविमा योजना सुधारित पद्धतीने लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी योजना
“विमा कंपनीचा लाभ न होता शेतकऱ्यांचा लाभ झाला पाहिजे, हा विचार समोर ठेवून ही योजना नव्याने तयार करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणं, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करणे यात ट्रॅक्टर, ड्रीप, मल्चिंग पेपर, बीबीएफ अशा वेगवेगल्या गोष्टींत गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र योजना राज्याच्या मंत्रिमंडळाने पारित केली आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.
नेमका काय बदल, अद्याप अस्पष्ट
सरकारने पीकविमा योजनेत केलेले हे बदल नेमके कसे आहेत? नेमकं काय काय बदलणार? याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीवेळी नेमकं काय बदललं हे समजणार आहे.
दरम्यान, पीकमिवा योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. बोगस अर्ज करून पीकविमा देणाऱ्या विमा कंपन्यांना सरकारी पैसे देण्यात आले, असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. त्यानंतर आता पीकविमा योजनेत सरकारने अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की पिक विमा पद्धतीत कोणते बदल झालेले आहेत याबाबत आपण माहिती घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा