WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free electricity scheme राज्यातील नागरिकांना मोफत वीज मिळणार लगेच करा हे काम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free electricity scheme आज आपण पाहणार की राज्यातील कोणत्या नागरिकांना मोफत वीज मिळणार आहे कशामुळे मिळणार आहे यासाठी तुम्हाला अर्ज कसा करावा लागणार पात्रता काय असतील आणि नेमकं मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलेला आहे याबाबत आपण आज माहिती पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे तर बघूया संपूर्ण माहिती.

Free electricity scheme संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे याबाबत त्यांनी सांगितले नाही की राज्यातील या नागरिकांना आता मोफत वीज मिळणार आहे किती वेळ मिळणार आहे कोणाला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार याबाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत सध्या उन्हाळ्याचा ऋतू चालू आहे उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा जास्त वापर होता आणि भरपूर लोकांना बिल देखील जास्त आहे तर शहरी भागात तर भरपूर दिले तर आणि यामुळे शेतकरी त्याचप्रमाणे नागरिक देखील वैतागलेले आहेत तर मुख्यमंत्र्यांनी आता मोठी गोष्ट केलेली आहे ती म्हणजे त्यांनी सांगितले की आता नागरिकांना 12 तास वीज मोफत मिळणार आहे तर कोणत्या नागरिकांना भगव्यात पूर्ण माहिती

राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना डिसेंबर २०२६ पर्यंत वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल, तसेच येत्या पाच वर्षांत राज्यातील सामान्य नागरिकांचे वीज बिल दरवर्षी कमी होईल,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. १३) केले. विदर्भात उद्योग उभारणीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासह ७२० कोटींच्या विकासकामांचे ई-लोकार्पण व भूमिपूजन झाले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले,‘‘राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. शेतीसाठी १२ तास विजेची शेतकऱ्यांची मागणी होती. यादृष्टीने शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, डिसेंबर २०२६ पर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांना वर्षभर दिवसाला

१२ तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल.
राज्य शासनाने २०२५ ते २०३० पर्यंत राज्यातील वीज वापरकर्त्यांचे बिल दरवर्षी कमी करण्याचे नियोजन केले आहे. तसेच ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेअंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल.’’ शेतकरी, शेतमजुरांवरील वन्यप्राण्यांचे हल्ले थांबविण्यासाठी शासन ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित व्यवस्थापन प्रणाली विकसित करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे यांच्यासह स्थानिक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

दहा जिल्हे होणार सुजलाम्‌ सुफलाम्‌
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे वर्ध्यासह विदर्भातील दहा जिल्ह्यांमधील काही दुष्काळग्रस्त भाग सुजलाम्‌ सुफलाम्‌ होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकल्पाद्वारे गोसीखुर्द धरणातील ६२ टीएमसी पाणी सांडव्याद्वारे वळविण्यासाठी ५५० किलोमीटर लांबीची नदीच तयार करण्यात येणार आहे. यासाठी एक लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठी सर्व मंजुऱ्या देण्यात आल्या असून योजनेचा अंतिम आराखडा तयार होत आहे. यावर्षाअखेरी किंवा पुढील वर्षाच्या सुरवातीला या योजनेचे काम सुरू होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

विदर्भात मोठी गुंतवणूक
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी १६.५ लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले असून यातील सात लाख कोटींचे करार विदर्भासाठी करण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. वर्ध्यासह विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्येही या माध्यमातून मोठी गुंतवणूक येणार आहे. येत्या काळात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये लोह खनिजावर आधारित उद्योग उभारणीसाठी राज्य शासनाने विशेष सवलत दिली असून या भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे प्रस्ताव शासनाकडे आले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या नागरिकांना मोफत वीज मिळणार आहे याबाबत आपण माहिती मिळालेली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा

2 thoughts on “Free electricity scheme राज्यातील नागरिकांना मोफत वीज मिळणार लगेच करा हे काम”

Leave a Comment