SSC HSC Passing rule 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी कशाप्रकारे पास होऊ शकतात बोर्डाचा कोणता नियम आहे ज्यामुळे सर्व विद्यार्थी पास होऊ शकतात याच बद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत
SSC HSC Passing rule 2025 पूर्ण माहिती
राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत यामध्ये आता बारावीच्या परीक्षा संपत आलेल्या आहेत तर दहावीचा पहिलाच पेपर झालेला आहे दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी परीक्षा दिलेले आहेत जवळपास दहावीचे सोळा लाख विद्यार्थी आहेत तर बारावीच्या जवळपास 12 लाख विद्यार्थी आहेत एकूण राज्यांमध्ये दहावी बारावीचे विद्यार्थी 35 ते 36 लाख आहेत त्यामुळे आता विद्यार्थ्यांना बोर्डाचा एक पासिंग रूल आहे त्या रूल नुसार मुल कसे काय पास होऊ शकतात तर आपण बघूयत पूर्ण माहिती
बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित असेल बायलॉजी फिजिक्स केमिस्ट्री किंवा इतर कुठले विषय असतील कॉमर्स मध्ये किंवा आर्ट्स असू द्या प्रत्येक विषयामध्ये तोंडी परीक्षा असते या तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षा एकत्रित गुण पद्धती करून विद्यार्थी सहजरीत्या पास होऊ शकतात यासाठी काही वेगवेगळे बोर्डाचे नियम आहेत
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे त्रिभाषा सूत्र
अंतर्गत मूल्यमापनात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी २० गुण मिळतात. त्यात भाषा विषयांत दहा गुण गृहपाठ व दहा तोंडी परीक्षेचे असतात. विज्ञानमध्ये प्रयोगवहीसाठी ८ गुण, प्रयोगाला १२ गुण तर गणित विषयासाठी १० गृहपाठ आणि १० गुण वस्तुनिष्ठ प्रश्ना उत्तरासाठी दिले जातात. बोर्डाच्या त्रिभाषा सूत्रानुसार (मराठी, हिंदी, इंग्रजी) तिन्ही विषयांत मिळून १०५ गुण मिळणे आवश्यक असून त्यातील एका विषयाला २५ गुण मिळाले तरी चालतात. हेच सूत्र गणित व विज्ञान विषयालाही लागू असून दोन्ही विषयांत मिळून ७० आणि एका विषयात किमान २५ गुण जरुरी आहेत. इतिहास व भूगोल (समाजशास्त्र) या विषयाला देखील २० गुण अंतर्गत असतात.
राज्यात कॉपीमुक्त अभियान फसले
बोर्डाने यावर्षी वारंवार सांगितलेलं की राज्यात कॉपीमुक्त अभियान होणार आहे राज्यात कुठेच कॉपी प्रकार घडला नाही आणि जिथे घडणार आहे तिथे काही ना काही कारवाई होणार परंतु कॉपीमुक्त अभियान यावर्षी फसलेला आहे कारण भरपूर ठिकाणी बारावी असेल दहावी असेल पेपर फुटीचे प्रकरण झालेले आहेत त्याचप्रमाणे कॉपी प्रकरण देखील भरपूर वाढलेले आहेत त्यामुळे यावर्षी कॉफी मुक्त अभियान फसले आहे
विद्यार्थ्यांनी परीक्षा दरम्यान काय करावे
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जरी चालू असतील तरी विद्यार्थ्यांनी या परीक्षा आपल्या तणावमुक्त द्याव्यात चिंता करू नये अभ्यास करावा वेळेवर आहार घ्यावा यामुळे त्यांचा आहार जर व्यवस्थित संतुलित असेल तर त्यांचा आरोग्य नीट राहील आणि आरोग्य जर नीट असेल तर तुम्ही परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित करू शकतात त्यामुळे अभ्यास करताना आपल्या आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपण कोणत्या बोर्डाच्या नियमामुळे पास होणार आहोत याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा
Creating Targat Student. Least bother about education.