SSC Hindi answer key today आज आपण पाहणार आहोत की दहावी बोर्डाचा हिंदी पेपर होताच बोर्डाने कोणता महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा निर्णय कशामुळे घेण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय कशामुळे महत्त्वाचा आहे याबाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत
SSC Hindi answer key today पूर्ण माहिती
राज्यात बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत दहावी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच सुरू झालेल्या आहेत दहावी बोर्डाच्या मराठी इंग्रजी हा पेपर झालेला आहे आज हिंदीचा पेपर होता हिंदीचा पेपर झाला त्यानंतर राज्य सरकार आणि शिक्षण मंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे आता भरपूर विद्यार्थी पालकांची इतिहास करण्याची शिक्षकांची चिंता वाढलेली आहे तर काही लोकांनी या निर्णयाचे स्वागत देखील केलेले आहे हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे यावर्षी बोर्डाने वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत जसं की हॉल तिकीट वर जात प्रवर्गाचा उल्लेख केला होता
परंतु काही काला नंतर तो निर्णय रद्द करण्यात आला त्यानंतर सरमिसळ पद्धत बैठे पथक भरारी पद्धत यांची संख्या वाढवली होती त्यानंतर कॉपीमुक्त अभियान राबवले होते प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले होते ड्रोन कॅमेरा यांची संख्या वाढवण्यात आले होते काही जर प्रकार केले तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार अशा प्रकारचं बोर्डाने निर्णय घेतले होते या सर्व निर्णयांमध्ये आता बोर्डाने आणखीन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
दहावीनंतर आता सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार
SSC Hindi answer key today राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये (Higher Secondary School and Junior College) आगामी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ (Academic year 2025-26) पासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने (11th Admission Process Central Online Method) राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण आयुक्त या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणार असून त्याची अंमलबजावणी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या स्तरावर केली जाणार आहे.याबाबत शिक्षण विभागातर्फे तयारी केली जात आहे,मात्र, त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
पूर्वी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी प्रत्येक महाविद्यालयात जाऊन अर्ज घ्यावा लागत असे. त्यानंतर अर्ज भरून महाविद्यालयांची ‘कट ऑफ’ यादी तपासून प्रवेश घ्यावा लागे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला आहे .
सुरुवातीला २००९-१० मध्ये मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई, ठाणे आणि रायगड या ठिकाणी ही प्रक्रिया लागू करण्यात आली. त्यानंतर २०१४-१५ मध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातही ती अंमलात आणली गेली. त्याची उपयुक्तता पाहता, अमरावती, नागपूर आणि नाशिक महापालिका क्षेत्रांतही या प्रक्रियेचा विस्तार करण्यात आला. आता राज्य सरकारने ही प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यास मान्यता दिली आहे.
त्यानुसार या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या शाखानिहाय तुकड्या, अनुदानित-विनाअनुदानित संस्था, स्वयंअर्थसहाय्यित शाखा, प्रवेश क्षमता, उपलब्ध विषय यांची अद्ययावत माहिती शिक्षण उपसंचालक ऑनलाइन सेवा पुरवठादारास उपलब्ध करून देतील. विद्यार्थी आणि पालकांना ही प्रक्रिया समजावी, यासाठी राज्य सरकारने जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, आवश्यक असल्यास प्रशिक्षणासाठी व्हिडिओ उपलब्ध करून देण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बोर्डाचा पेपर झाल्यानंतर बोर्डाने शिक्षण मंडळाने कोणता महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
I want for checking the answer