After 10th 12th course आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेनंतर आता विद्यार्थ्यांना मोठा प्रश्न असतो तो म्हणजे निकालाचा आणि निकालानंतर आणखीन एक मोठा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे करिअरचा कोर्स करायचा काय फायदा होईल किती वर्षाचा असेल याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत.
After 10th 12th course संपूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेनंतर आता विद्यार्थ्यांचे सर्वात महत्त्वाचं लक्ष असतं ते आपल्या करिअर कडे आणि करिअर आपलं कसं असावं याबाबत ही वेळोवेळी मार्गदर्शन घेत असतात शिक्षकांना सांगत असतात नातेवाईक सांगत असतात आपण तेच बघणार आहोत की दहावी-बारावीनंतर आपल्याला कुठलं करिअर चांगला मार्गदर्शन मिळेल आपणास कुठल्या क्षेत्रात गेल्यानंतर आपल्याला चांगला स्कोप असेल याविषयी आपण माहिती पाहूयात
दहावी झाल्यानंतर कोणते कोर्स आहेत
दहावीची परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम कॉलेज जीवनामध्ये भरपूर सारे पर्याय उपलब्ध असतात आर्ट्स कॉमर्स सायन्स यामध्ये तुम्ही डिग्री कोर्स करू शकता त्यानंतर तुम्हाला आणखीन एक पर्याय असतो तो म्हणजे आयटीआय आयटीआय मध्ये वेगवेगळे प्रकारचे trade असतात एक वर्षाचे दोन वर्षाचे यामध्ये तुम्ही आयटीआय पूर्ण करून जॉब करू शकतात किंवा त्यानंतर डिप्लोमाला डायरेक्ट ऍडमिशन देऊ शकता त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मेडिकल लाईफ मध्ये देखील जाऊ शकता डिप्लोमा देखील करू शकता डिप्लोमा तुम्ही करण्यासाठी तुम्हाला तीन वर्षाचा जपून असतो आणि डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता असं देखील एक मार्ग आहे हे सर्व जे कोर्स आहेत त्या कोर्स करून तुम्ही चांगला जॉब मिळू शकतात
After 10th 12th course सध्या सगळीकडे दहावी आणि बारावीच्या निकालाची चर्चा सुरू आहे. एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू झाला आहे यामुळे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची चर्चा होणे स्वाभाविक आहे. मीडिया रिपोर्ट नुसार पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला बारावीचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर मग दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण बारावी नंतर विद्यार्थ्यांनी कोणते कोर्सेस केले पाहिजेत जेणेकरून त्यांना लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरीं मिळेल याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बिजनेस आणि मॅनेजमेंट : बारावीनंतर कोणता कोर्स करायचा असा जर तुमचा प्रश्न असेल आणि तुमची मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी बिझनेस आणि मॅनेजमेंटची फिल्ड उत्तम राहणार आहे.
बारावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी BBA, PGDM किंवा मार्केटिंग/फायनान्स सारखे कोर्सेस केले तर त्यांना चांगल्या एमएनसी मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी लागू शकते. मात्र विद्यार्थ्यांनी हे कोर्स नामांकित विद्यापीठातून तसेच शैक्षणिक संस्थांमधून करायला हवेत जेणेकरून त्यांना चांगल्या कंपनीत सहज नोकरी मिळू शकेल.
हार्डवेअर आणि नेटवर्किंग : ज्या विद्यार्थ्यांना आयटी कंपनीमध्ये काम करायची इच्छा असेल पण इंजिनिअरिंगला जाणं शक्य होणार नाही असे वाटते. आणि आर्थिक परिस्थितीमुळे इंजिनिअरिंग ऐवजी दुसरे कोर्सेस शोधात असाल तर अशा विद्यार्थ्यांसाठी हार्डवेअर आणि
नेटवर्किंगमधला डिप्लोमा एक बेस्ट पर्याय ठरू शकणार आहे.
हा डिप्लोमा केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहजतेने आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या कोर्सेसच्या मदतीने आणि संगणक, नेटवर्क सेटअप, रिपेअरिंग अशा स्किल्स शिकून विद्यार्थी आयटी कंपनीत नोकरी मिळू शकतो. या फिल्डमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजची नोकरी मिळणार आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI : सध्या संपूर्ण जगात AI बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील असे बोलले जात आहे. कदाचित ही गोष्ट खरी असेल पण यामुळे काही नोकऱ्या जनरेट सुद्धा होणार आहेत. खरेतर हे भविष्याचं संपूर्ण तंत्रज्ञान आहे ही गोष्ट आपल्याला नाकारून चालणार नाही.
यामुळे सध्याच्या परिस्थितीचा विचार केला असता विद्यार्थ्यांनी या फील्डमध्ये करिअर करायला काही हरकत नाही. विद्यार्थ्यांनी बारावीनंतर या क्षेत्रात डिप्लोमा केल्यास त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. विद्यार्थी या क्षेत्रातील डिप्लोमा करून मशीन लर्निंग, NLP, आणि ऑटोमेशनच्या जगात चांगली संधी मिळवू शकतात.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावीनंतर आपण कोणते कोर्स केले पाहिजे ज्यामुळे आपल्याला चांगला फायदा होईल याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहे प्ले स्टोर वरून डाउनलोड करा