Scholership 10th 12th आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी पास विद्यार्थ्यांना 20हजार कसे मिळणार यासाठी त्यांना अर्ज कसा करावा लागेल पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा किंवा ऑनलाईन करायचं हे पैसे विद्यार्थ्यांना कसे मिळतील आणि कोणत्या योजनेअंतर्गत हे पैसे त्यांना मिळणार आहेत याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत
Scholership 10th 12th संपूर्ण माहिती
राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे दहावी बारावी बोर्डाचा निकाल लागला यावर्षी जवळपास विद्यार्थी जे पास झालेले आहेत त्यांच्यासाठी आता सरकारने शिष्यवृत्ती देण्याचा बक्षीस देण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे 5000 पासून ते 30 हजारापर्यंत ही बक्षिसाची रक्कम आहे कोणत्या विद्यार्थ्यांना कशी मिळणार कोणत्या स्वरूपात मिळणार या सर्व विषयाची माहिती आपण घेणार आहोत पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये तुम्हाला काही अडचणी येऊ नये आर्थिक अडचण म्हणून थोडीशी मदत म्हणून शासनाने हा उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना काय करावे लागेल या विषयाची माहिती आपण आज बघणार आहोत आणि त्यांना हे पाच ते 30 हजार पर्यंतची रक्कम भेटेल ते त्यांच्या शैक्षणिक जीवनात खूपच उपयुक्त ठरणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती बघुयात.
Scholership 10th 12th इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राघोजी भांगरे गुणगौरव योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत दहावी-बारावीच्या यशवंतांचा प्रकल्प कार्यालय, अपर आयुक्त आणि राज्यस्तरावर सन्मान केला जाणार आहे.अनुसूचित जमातीच्या संबंधित विद्यार्थ्यांना ५ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाकडून शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, नामांकित शाळा, सैनिकी शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल चालविल्या जातात. यातील काही शाळा राज्य शिक्षण मंडळ तर काही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. या दोन्ही मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आदिवासी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. दहावीसह बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रत्येकी ५ गुणवंत मुला-मुलींचा पारितोषिक दिले जाणार आहे. गुणवत्ता यादीत विशेष प्रावीण्यासह गुण मिळवून राज्य, अपर आयुक्त आणि प्रकल्पात प्रथम येणाऱ्या ५ मुला-मुलींना गौरविण्यात येणार आहे.
सीबीएसई बोर्डाचे विभागीय मंडळ नसल्याने ते वगळून राज्य शिक्षण मंडळाच्या ९ विभागीय मंडळातील प्रत्येकी २४ गुणवंतांना दहा महिन्यांसाठी प्रतिमाह एक हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. अपर आयुक्त आणि प्रकल्प स्तरावर शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतून प्रथम येणाऱ्या तीन मुला-मुलींना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच १०० टक्के निकाल लागलेल्या आश्रमशाळांचा सत्कार केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी चांगली योजना
अनुसूचित जमातीच्या पालकांनी आश्रमशाळेत प्रवेश घेऊन योजनेचा लाभ घेण्याकरिता सोलापूरमधील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, संगमेश्वर महाविद्यालयासमोरील भारत संचार निगम लिमिटेड कार्यालयाशी संपर्क साधावा.
– सागर नन्नवरे, प्रकल्प अधिकारी
असे असणार बक्षीसांचे स्वरूप
गुणवत्तेनुसार प्रथम क्रमांक मिळवणाऱ्याला राज्य स्तरावर ३० हजार, अपर आयुक्त स्तरावर १५ हजार आणि प्रकल्प कार्यालयात १० हजार रुपये मिळतील. द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे २५ हजार, १० हजार व ७ हजार, तर तृतीय क्रमांकासाठी २० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये दिले जातील. चौथा क्रमांक मिळवणाऱ्याला १५ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी १० हजार रुपये मिळणार आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावी बारावी पास विद्यार्थ्यांना हे पैसे कसे मिळणार याची माहिती आपण घेतले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
