11th addmission process आज आपण पाहणार आहोत की अकरावी प्रवेशासाठी आपल्याला कोणते कागदपत्र लागतील याची माहिती आपण आज घेणार आहोत कारण दहावीनंतर जर तुम्ही अकरावी प्रवेश घेणार असता आणि कुठल्याही स्ट्रीम मध्ये तुम्ही जात असेल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र असणे गरजेचे आहे कारण याच कागदपत्रांच्या आधारे तुम्हाला पुढील प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे तर बघूया संपूर्ण माहिती
11th addmission process संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे विद्यार्थ्या जीवनात सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं प्रवेश प्रक्रिया असते कारण दहावीनंतर तुम्हाला अकरावी मध्ये जो प्रवेश मिळणार असतो तो संपूर्णतः तुमच्या निकालावर आणि तुमच्याकडे कागदपत्र असतील त्या आधारावर असतात तुमच्याकडे जर कागदपत्र नसतील तर तुम्हाला जरी चांगले टक्के असेल तरी तुम्हाला त्याचा लाभ घेता येत नाही कागदपत्राचे अभावी कितीतरी मुलांना ऍडमिशन होत नाही त्यामुळे आत्ताच ती कागदपत्र तयार करून ठेवा. तर बघुयात आपण कोणत्या कागदपत्र आपले लागणार आहेत
11th addmission process शासन निर्णयानुसार इयत्ता अकरावी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्राबरोबरच शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय मध्ये राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून त्या अनुषंगाने केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे तयार ठेवण्यात यावीत, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
कोणती कागदपत्र आवश्यक
1. इयत्ता दहावी /समकक्ष परीक्षेचे गुणपत्रक
2. इयत्ता दहावी शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत
3. विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला
4. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. EWS पात्रता प्रमाणपत्र
6. दिव्यांग प्रमाणपत्र
7. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
8. आजी माजी सैनिक पाल्य प्रमाणपत्र
9. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी यांच्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे प्रमाणपत्र
10. अनाथ विद्यार्थ्यांनी विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग यांचे प्रमाणपत्र.
11. परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित देशातील भारतीय दूतावासाची सही व शिक्का असलेले दाखला व गुणपत्रक.
12. हस्तांतरण आदेश आणि सामीलीकरण पत्र (Transfer order and joining letter)
(राज्य शासन/केंद्र सरकार/ खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बदली झालेल्या पालकांसाठी)
राज्य मंडळातर्फे येत्या आठवड्याभरात दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.त्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करणे बंधनकारक आहे.त्यामुळे अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी ही कागदपत्र काढून ठेवावीत,असे आवाहन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की अकरावी प्रवेशासाठी आपल्याला कुठली कागदपत्र लागणार आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट सर सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515126या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्लेस्टोर वरून डाउनलोड करा