WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC result 2025 दहावी बारावी बोर्डाचे सर्व विद्यार्थी यावर्षी पास बोर्डाचा मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC result 2025  आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाचे विद्यार्थी कशाप्रकारे पास होऊ शकतात त्यांना काय करावे लागणार आहे यासाठी बोर्डाचा नियम काय सांगतो याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

SSC HSC result 2025 पूर्ण माहिती

SSC HSC result 2025  दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेले आहेत यातच आता बोर्डाचे काही नियम आहे त्यामुळे तुम्ही कशाप्रकारे सर्वच विद्यार्थी पास होऊ शकतात याचीच माहिती आपण घेणार आहोत दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे यामध्ये बोर्डाचे काही नियम आहेत या नियमांचा वापर करून तुम्ही अलगरीत प्लॅनिंग करून चांगल्या प्रकारे मार्क्स आणि पास होऊ शकतात याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहणार आहोत

दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेत पास होणे आता अवघड राहिलेले नाही. प्रत्येक विषयासाठी अंतर्गत २० गुण (प्रात्यक्षिक व तोंडी) व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्राचा अवलंब केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणताही तणाव न घेता आत्मविश्वासाने अभ्यास करून चांगल्या टक्केवारीसाठी प्रयत्न करावा.

बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या २० गुणांमुळे (प्रत्येक विषयांसाठी) विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्रानुसार पास होणे काहीच अवघड नाही. पण, टक्केवारी जास्त मिळविण्यासाठी त्यांनी पाठांतरापेक्षा स्वतः नोट्स काढणे, उत्तरे वेळेत लिहिण्याचा सराव करणे, पहाटे पाच-साडेपाचला उठून अभ्यास, मनावर दडपण तथा भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाणे आणि परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर पोचणे, या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास निश्चितपणे चांगला फायदा होईल, असा विश्वास मुख्याध्यापक संघाने व्यक्त केला आहे.

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षेत सरमिसळ पद्धत असणार आहे. एकाच शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देतील. काही केंद्रांवरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक दुसऱ्या शाळांमधील अनोळखी असतील. परीक्षा केंद्राबाहेर बैठे पथक असेल व काहीवेळा भरारी पथकांच्या देखील भेटी होतील. त्यामुळे कोणीही गैरमार्गाचा अवलंब न करता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे.

राज्यातील परीक्षा कॉपीमुक्त होणार

यावर्षी राज्यात कॉपीमुक्त परीक्षा होणार आहेत याचा उल्लेख वारंवार बोर्डाकडून करण्यात येत आहे त्यासाठी राज्यभरातील सर्व जे पण परीक्षा केंद्र आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही केंद्र असणार आहेत त्याचप्रमाणे पर्यवेक्षकांची अदलाबदली काही शाळांवर असणार आहे विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा कुठल्याही कॉपी प्रकरणाला बळी पडू नये अशा बोर्डाकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालयात झालेल्या पूर्व व सराव परीक्षेतील चुका, कमतरता दूर करून परीक्षेची तयारी करावी. परीक्षेत पास होणे फार अवघड राहिलेले नाही, त्यामुळे सर्वांनीच टक्केवारी जास्त कधी पडेल, यासाठी मन प्रसन्न ठेवून अभ्यास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे त्रिभाषा सूत्र

अंतर्गत मूल्यमापनात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी २० गुण मिळतात. त्यात भाषा विषयांत दहा गुण गृहपाठ व दहा तोंडी परीक्षेचे असतात. विज्ञानमध्ये प्रयोगवहीसाठी ८ गुण, प्रयोगाला १२ गुण तर गणित विषयासाठी १० गृहपाठ आणि १० गुण वस्तुनिष्ठ प्रश्ना उत्तरासाठी दिले जातात. बोर्डाच्या त्रिभाषा सूत्रानुसार (मराठी, हिंदी, इंग्रजी) तिन्ही विषयांत मिळून १०५ गुण मिळणे आवश्यक असून त्यातील एका विषयाला २५ गुण मिळाले तरी चालतात. हेच सूत्र गणित व विज्ञान विषयालाही लागू असून दोन्ही विषयांत मिळून ७० आणि एका विषयात किमान २५ गुण जरुरी आहेत. इतिहास व भूगोल (समाजशास्त्र) या विषयाला देखील २० गुण अंतर्गत असतात.

अशाप्रकारे आपण पाहिलं की बोर्डाच्या या नियमामुळे दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थी सर्व पास होऊ शकतात दहावी-बरावी बोर्डाच्या नोट्स साठी 932225151या क्रमांकावर फोन करा अथवा प्ले स्र वरून नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलीग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment