SSC HSC exam 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे विद्यार्थ्यांना पाच गुण हे कसे मिळणार आहेत अभ्यास न करता याचीच माहिती आपण घेणार आहोत यासाठी विद्यार्थ्यांना काय करावे लागणार आहे काय याची पूर्ण विश्लेषित माहिती आपण बघुय
SSC HSC exam 2025 पूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा आता जवळ आलेले आहेत बारावीच्या परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे तर दहावीच्या परीक्षा ह्या 21 फेब्रुवारीपासून सुरुवात आहेत बोर्डाने यावर्षी भरपूर काही निर्णय घेतले आहेत परंतु वादाच्या वावरात बोर्डाचे निर्णय आढळले आहेत याच बोर्डाचा एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख केला होता तो देखील बोर्डाने आता मागे घेतलेला आहे त्यानंतर शिक्षक अदलाबदलीचा निर्णय यात आता थोडासा बोर्डाने सशक्तीने थोडंसं सुलभ हा निर्णय केलेला आहे
नवीन उपक्रम विद्यार्थ्यांना पाच गुण मिळणार
SSC HSC exam 2025 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावी परीक्षेत कला, चित्रकला, क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह एनसीसी, स्काऊट व गाईडमधील सहभागाबद्दल सवलतीचे गुण दिले जातात. आता यात ‘उल्लास नवभारत साक्षरता’ कार्यक्रमात सहभागाबद्दल ही सवलतीचे गुण देण्याचा विचार होतो आहे. तसा प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठविण्यात आला आहे
राज्यात शिक्षण संचालनालय योजना कार्यालयाकडून ‘नवभारत साक्षरता’ उपक्रमासह ३९ योजना, उपक्रम राबविले जातात. साक्षरता उपक्रमात शिक्षकांचा प्रतिसाद नगण्य आहे. शिक्षकांचा सहभाग कमी असल्याने निश्चित उद्दिष्ट साध्य होणे अवघड ठरण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये निरक्षरांची संख्या नेमकी किती याबाबत स्पष्टता नाही.
२०११ मधील जनगणनेनुसार राज्यभरात १ कोटी ६२ लाखांपेक्षा अधिक निरक्षर असल्याचे सांगण्यात येते. २०३० पर्यंत सर्वांना साक्षर करण्याचे उल्लास नवभारत साक्षरता मोहिमे अंतर्गत उद्दिष्ट ठेवण्यात आले. परंतु शिक्षकांचा सहभाग कमी असल्याने उपक्रम अडखळत सुरु असल्याचे सांगण्यात येते. आता त्यात काम करणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभाग ‘सवलतीचे गुण’ यावर विचार करत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे नुकताच प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. आता तो राज्य सरकारकडे जाईल. आणि धोरणात्मक निर्णय होईल, असे सांगण्यात येते.
विद्यार्थ्यांना या गोष्टी करावे लागणार
साक्षरता मोहिमेत निरक्षरांना पाच टप्प्यांत शिक्षण दिले जाणार आहे. यात पायाभूत साक्षरतेचा पहिला टप्पा असून त्यात लेखन, वाचन, संख्याज्ञान याचा समावेश आहे. यानंतर जीवन कौशल्य विकास असेल. ज्यामध्ये आर्थिक, कायदेविषयक साक्षरतेवर भर राहील. यानंतर मुलभूत शिक्षण, व्यावसायिक कौशल्य प्राप्ती आणि निरंतर शिक्षण आहे.
शिक्षक गावात सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करतात. आणि या निरक्षरांना साक्षर करण्याचे काम स्वयंसेवक करतात. आठवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी हे काम करतात. त्यांच्या या कामासाठी सवलतीचे गुण दिले तर शंभर टक्के सहभाग मिळेल. आणि पालकही सहभागी होतील, असे शिक्षण विभागाला वाटते. एका स्वयंसेवकाला अधिकाधिक पाच गुण दिले जातील. त्यासाठी किमान त्याला पाच निरक्षरांना साक्षर करावे लागेल, अशी अट असेल.
दहावी, बारावी विद्यार्थ्यांना कला, क्रीडा गुणांसह आता निरक्षरांना साक्षर करण्यासाठीही सवलतीचे गुण मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी स्वयंसेवकाने किमान पाच निरक्षरांना साक्षर केले, तर पाच गुण मिळतील. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शिक्षण संचालनालय (योजना) यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला पाठवला आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी-बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे पाच गुण बोर्डाकडून मिळणार आहे याची माहिती आपण पाहिले आहे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा