School new niyam आज आपण पाहणार की राज्यातील शाळा सुरू झालेले आहेत याबाबत आता शाळेपासून नवीन नियम लागू झालेले आहेत आता कोणते नियम लागू झालेले आहेत त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे या नियमांचा काय फायदा होणार आहे त्याचप्रमाणे हा नियम कशामुळे लागू केलेला आहे आयुष्य माहिती आपण बघणार आहोत
School new niyam संपूर्ण माहिती
राज्यातील शाळा कॉलेज आजपासून सुरू झालेले आहेत यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे की नवीन नवीन दृष्टिकोनातून नवीन नवीन लागू करण्यात आलेले आहेत या वर्षी आता पहिली वरच्या वर्गात नवीन एज्युकेशन पॉलिसी देखील लागू करण्यात आलेले आहेत हळू टप्प्याने कालांतराने दहावीपर्यंत बारावीपर्यंत ही पॉलिसीला होणार आहे त्यातच आता काही नवीन शाळेसाठी नियम लागू केलेले आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही नियम लागू करण्यात आलेले आहेत ही बातमी अत्यंत महत्त्वाचे आहे बघुयात माहिती
School new niyam नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा आजपासून सुरू झाल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शालेय शिक्षण विभागाकडून तातडीने नव्या आदेशाची अंमलबजावणी सर्व शाळांमध्ये करण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार दिवसभरात विद्यार्थ्यांची तीन वेळा हजेरी घेतली जाणार आहे. गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तत्काळ ‘एसएमएस’ पाठविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेतील सुरक्षा व्यवस्था तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीची पडताळणी यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश या आदेशात केला आहे. प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आले आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून समुपदेशक नेमण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
विद्यार्थी अनुपस्थित असल्यास पालकांना लगेचच कळवले जाणार आहे. सर्व शाळांना दिवसातून सकाळी, दुपारी आणि सायंकाळी अशी तीनवेळा विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाणार आहे. यंदापासून सर्व शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सीसीटीव्ही बंधनकारक
विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शाळेच्या सर्व परिसरात सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे शाळेतील कोणताही अनुचित प्रकार टाळता येणार आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरा वर्गाचे दरवाजे, मार्गिका, प्रवेशद्वार, मैदाने तसेच स्वच्छतागृहांबाहेर लावणे बंधनकारक असणार आहेत. या सीसीटीव्हीचे एक महिन्याचे चित्रण जतन आवश्यक करण्यात आले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणूक करताना पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास सेवा तत्काळ समाप्त करणे, आपत्कालीन घंटा उपलब्ध असावी, असे नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थी सुरक्षिततेची जबाबदारी
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात नवे नियम आणि सूचना जारी केल्या आहेत. त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेवरच राहणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार माजी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसींनुसार सकाळी, दुपारी व सायंकाळी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाईल.
अशाप्रकारे आपण बघितलं की शाळेमधील कोणते नियम आजपासून नवीन लागू केलेले आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा