WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card eKYC date या नागरिकांचे कायमचे रेशन कार्ड बंद होणार सरकारचा मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card eKYC date आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे काही नागरिकांच्या आता कायमची रेशन कार्ड बंद होणार आहे सरकारने याबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो कोणता निर्णय आहे आणि आपल्याला त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती आपण घेणार आहोत

Ration Card eKYC date संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे आणि मोठी बातमी समोर येत आहे. राशन कार्ड म्हणजे आपला एक सर्वात मोठा पुरावा आहे पुरावा असून सर्व शासकीय योजनेचा लाभ देखील आपल्याला राशन कार्ड वर मिळत असतो आणि त्याचप्रमाणे गोरगरीब माणसांचा सर्वात मोठा आधार देखील राशन कार्ड आहे कारण या ठिकाणी आपल्याला मोफत गहू तांदूळ मिळत असतात त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण येत नाही त्यामुळे राशन कार्ड हा सर्वात मोठा पुरावा असून सर्वात मोठा आधार देखील आहे परंतु आता काही लोकांचे काही नागरिकांचे राशन कार्ड बंद होणार आहे कोणत्या कारणामुळे होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल की ज्यामुळे आपले राशन कार्ड बंद होणार नाही याची माहिती आपण घेऊयात.

Ration Card eKYC  date सध्या शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे आधार, बँकेचे खाते किंवा इतर कोणत्याही शासकीय लाभासाठी ई-केवायसी बंधनकारक आहे. रेशनकार्ड धारकांसाठीही हे नियम लागू झाले असून 30जून 2025 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. रेशन कार्ड ची ई-केवायसी दोन पद्धतीने करता येऊ शकते, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ.

पुरवठा विभागाने दिले स्पष्ट निर्देश
सरकारने केशरी, पांढऱ्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी करण्याची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. या प्रक्रियेत रेशनकार्ड धारकांना त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी पडताळणी करावी लागेल. अन्यथा, संबंधितांना धान्य वितरण सेवेचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

ई-केवायसी न केल्यास शिधापत्रिकेचा लाभ बंद होण्याची शक्यता

एक लाख तीन हजार 555 रेशनकार्डधारकांची अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. 31 मे ही अंतिम मुदत होती. मात्र अजूनही ई-केवायसी प्रलंबित आहे. प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, ई-केवायसी न केल्यास शिधापत्रिकेतील नावे कमी होतील आणि अन्नधान्याचा लाभ बंद होऊ शकतो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक सदस्याचे ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. रेशन दुकानातील पॉस मशिनवर ही प्रक्रिया केली जाते.

रेशन कार्ड ई-केवायसी कशी करायची?
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, कार्ड धारकांनी त्यांच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन फोर-जी ईपॉस (POS) मशीनने केवायसी करणे आवश्यक आहे. आधार कार्ड सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे. मशीनमध्ये आधार क्रमांक टाकल्यानंतर, बोटांचे ठसे आणि डोळे स्कॅन करून प्रक्रिया पूर्ण केली जाते.

ऑनलाइन ई-केवायसी कशी करायची?
याशिवाय, “मेरा राशन” या अ‍ॅपच्या मदतीनेही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. गुगल प्ले स्टोअरवरून “मेरा राशन” अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, रेशनकार्ड क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून सबमीट बटणावर क्लिक करावे लागेल.
आधार सिडिंगच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर, कुटुंबातील सदस्यांच्या नावासमोर “Yes” किंवा “No” असे ऑप्शन दिसेल. “Yes” असल्यास त्या सदस्याला ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही, तर “No” असल्यास त्याला प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

ई-केवायसी करण्याची मुदत वाढवली!
सरकारने ई-केवायसी केलेल्यांनाच रेशन मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ३० सप्टेंबरपासून सुरु झालेली ही प्रक्रिया 30जून  वाढवण्यात आली आहे. या तारखेनंतर ई-केवायसी न केलेल्यांना रेशनकार्डावरून लाभ मिळणार नाही, आणि त्यांची नावे काढून टाकली जाऊ शकतात.

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या नागरिकांचे रेशन कार्ड कायमचे बंद होऊ शकते याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment