WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गर्भवती महिलांना 5000 मिळणार आताच अर्ज करा PM Matru Vandana Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्र सरकारने देशातील गर्भवती महिला आणि नवमातांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना PM Matru Vandana Yojana असे या योजनेचे नाव आहे. या योजनेद्वारे, पहिल्यांदा गर्भवती होणाऱ्या महिलांना सरकारकडून ५,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही मदत महिलांना त्यांच्या गर्भधारणेदरम्यान आणि बाळाच्या जन्मानंतर पोषण आणि आरोग्य सेवा घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाते.

नेमकी काय आहे ही योजना?

पहिल्यांदा गरोदर असलेल्या महिलांना आणि स्तनपान करणाऱ्या मातांना आर्थिक सहाय्य करणे. पहिल्या प्रेग्नेंसीसाठी ५,००० रुपये तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जातात. एवढेच नव्हे, तर जर महिलेला दुसऱ्यांदा गर्भधारणा झाली आणि तिने मुलीला जन्म दिला, तर अशा वेळी सरकारकडून ६,००० रुपये इतकी मदत दिली जाते.

या महिलांना मिळणार योजनेचा लाभ –

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय १९ वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग महिला, दारिद्र्यरेषेखालील (BPL) कार्डधारक, आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी, ई-श्रम कार्डधारक, शेतकरी सन्मान निधीचे लाभार्थी, मनरेगा जॉब कार्डधारक वर्गातील महिला अर्ज करू शकतात.

ऑफलाईन अर्ज कसा करावा?

तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्रात जाऊन फॉर्म जमा करून ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज करू शकता. केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घेऊन महिलांनी आपले आणि आपल्या बाळाचे आरोग्य सुधारावे, यासाठी सरकारने हा मोठा हातभार लावला आहे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध –

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो. बाळाच्या जन्माच्या २७० दिवसांच्या आत अर्ज करणे अनिवार्य आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

-सर्वात आधी अधिकृत वेबसाइट pmmvy.wcd.gov.in वर जा.
-आपला मोबाईल नंबर टाकून ओटीपी (OTP) द्वारे नोंदणी करा.
-मागितलेली सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरा.
-लॉगिन करून संपूर्ण अर्ज फॉर्म भरा.
-संबंधित आवश्यक कागदपत्रे जोडून अपलोड करा.

राज्य अन् केंद्र सरकारच्यावतीनं  महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. प्रधानमंत्री मातृवंदना योजना त्यापैकीच एक आहे. ही योजना केंद्र सरकारतर्फे आणि राज्य सरकारकडून संयुक्तपणे चालवण्यात येते.  या योजनेची अंमलबजावणी गर्भवती माता, स्तनदा माता तसेच नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे यासाठी केली जाते.प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतर्फे महिलांना 5000 रुपयांची मदत दिली जाते.  मात्र, ही रक्कम तीन टप्प्यात देण्यात येते. पहिल्या टप्प्यात नोंदणी केल्यानंतर 1 हजार रुपये, गर्भधारणेला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर 2 हजार आणि प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नोंदणी आणि पहिल्या लसीकरणानंतर 2 हजार रुपये मिळतात.     

केंद्र सरकारनं 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना लागू केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या तरतुदीनुसार ही योजना सुरु करण्यात आली होती. 

 
या योजनेचा लाभ कुणाला मिळतो?

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेद्वारे दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र्यरेषेवरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेत महिलांना तीन टप्प्यांमध्ये 5 हजार रुपये मिळतात.

महाराष्ट्रात किती महिलांना लाभ मिळाला?

प्रधानमंत्री मातृवंदना योजना केंद्र आणि राज्य सरकारकडून संयुक्तपणे ही योजना राबवली जाते.  महाराष्ट्रातील 8 लाख 37 हजार 399 गर्भवती महिला व मातांनी याचा लाभ जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2024 दरम्यान घेतला आहे. तर, 2017 पासून 2022 पर्यंत 34 लाख 9  हजार 449 महिलांना याचा लाभ मिळाल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Comment