WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panipatti gharpatii scheme  सरकारी शाळेत प्रवेश घेतल्यास पाणीपट्टी घरपट्टी माफ होणार सरकारचा मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panipatti gharpatii scheme आज आपण पाहणार आहोत की आपल्याला कोणत्या शाळेत प्रवेश घेतल्यास पाणीपट्टी घरपट्टी माफ होणार आहे याबाबत काय निर्णय झालेला आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत विद्यार्थी बालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे कारण आता तुम्ही बघत असेल की जून महिन्यात सुरू होत आहे प्रवेशाचे स्वतः सुरू होत आहे यादरम्यान हा निर्णय घेण्यात आल्याने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे बघुयात संपूर्ण माहिती. ..

Panipatti gharpatii scheme संपूर्ण माहिती.

विद्यार्थी पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे पाणीपट्टी घरपट्टी माफ होणार आहे कोणत्या नागरिकांची होणार आहे कशामुळे होणारे याविषयी आपणास माहिती घेणार आहोत ती म्हणजे आता सर्वांना तुम्हाला माहीत असेल की सरकारी शाळेत आपण प्रवेश घेतला तर विद्यार्थ्यांना जर शिक्षण मोफत मिळेल सोबत तुमची पाणी पट्टी आणि घरपट्टी देखील माफ होणार आहे याबाबत एक महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे नेमके महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे कोणत्या विद्यार्थ्यांना हा लागू होणारे आहे विद्यार्थ्यांचे शिक्षण हे सर्वांगीण विकासाचा एक महत्त्वाचं कारण आहे कारण शिक्षण त्यांना चांगलं भेटलं तर भविष्यामध्ये त्याचे यश संपादन त्याला होत असतं वयाच्या वेळी त्यांना योग्य शिक्षण भेटणे हे गरजेचं असतं परंतु आर्थिक अडचणीमुळे भरपूर मुले हे शिक्षण न करता कामाला लागतात त्याच कारण अवस्था आता जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे शिक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत.





Panipatti gharpatii scheme आज शहरी भागातील कॉन्वेंटचे (इंग्लिश स्कूल) प्रमाण ग्रामीण भागात झपाट्याने वाढत चालले आहे. सिंदखेडराजा तालुक्यात ५ हजार वस्ती असलेल्या गावातही इंग्लिश स्कूल सुरु झालेल्या आहेत. गणवेश, पुस्तके, बुट इत्यादी शालेय साहित्य या शाळेतून विद्यार्थ्यांना दिले जाते.

येण्या-जाण्यासाठी स्कुल बस यांचे सर्व पैसे आकारले जातात. माझा मुलगा इंग्लिश स्कूलमध्ये आहे, याचा अभिमान प्रत्येक पालकाला आहे. या स्पर्धेच्या युगात खाजगी शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक प्रत्येक गावात जाऊन आपल्या शाळेची गुणवत्ता कशी आहे, याचे नियोजन करून उन्हाळ्याच्या सुट्टीत घरोघरी जाऊन पालकांशी संवाद साधत आहेत. तिचं परिस्थिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत असायला पाहिजे. परंतु, प्राथमिक शाळेतील शिक्षक असे कधीच करताना दिसत नाहीत.

उलट आपली पाल्ये तेदेखील इंग्लिश स्कूलमध्ये टाकून आपली जबाबदारी झटकत आहेत. आज वाढत्या शैक्षणिक स्पर्धेच्या युगात मराठी शाळेचे भवितव्य टिकून ठेवण्यासाठी व गावातील लोकांना मराठी शाळेविषयी जाणीव निर्माण व्हावी हा या मागचा उद्देश आहे. गावातील प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेतून सुरू करावे. ही माफक अपेक्षा ग्रामपंचायतीलाच का आहे? शाळेमध्ये सरकारी योजनाचा लाभ मिळतो तो खाजगी शाळेमध्ये हा लाभ मिळत नाही. शिष्यवृत्ती, गणवेश, पोषण आहार अशा अनेक योजना सरकारकडून जि.प. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळतात. या शाळा टिकवण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम काही ग्रामपंचायतीची घेतला आहे.

त्यासाठी शिक्षकांनीसुध्दा पुढाकार घेतला पाहिजे, अशी माफक अपेक्षा पालकांची आहे. हिवरागडलिंग येथील ग्रामपंचायतीने ठराव घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. तेच पाऊल जिल्हा परिषद शिक्षण विभागाने टाकायला पाहिजे होते. आज साखरखेर्डा येथे तीन इंग्लिश स्कूल, एक खाजगी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा तीन अशी प्राथमिक शाळेची संख्या आहे. शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, किनगाव राजा, जांभोरा, सिंदखेडराजा येथेसुध्दा हीच परिस्थिती आहे. एस टी महामंडळाच्या बसेसपेक्षा खाजगी शाळेच्या बसेस अधिक ग्रामीण भागात धावताना दिसतात, असं चित्र दिसत आहे.

ग्रामपंचायतीने पाणी व घरपट्टी माफ केली तर ग्रामपंचायतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. तसेही शासनाकडून ग्रामपंचायतींना निधी कमी मिळत असून, पाणी पुरवठा, दिवाबत्ती, कर्मचार्‍यांचे पगार, सामाजिक सेवा यांच्या खर्चाचा भार ग्रामपंचायतीवर आहे. अनेक ग्रामस्थ वर्षेनुवर्षे कर भरत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न घटले तर सेवा देताना आर्थिक संकटांचा सामना ग्रामपंचायतींना करावा लागणार आहे.

तरीदेखील जिल्हा परिषदेच्या शाळा खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकाव्यात म्हणून लोकाभिमुख सरपंचांच्या नेतृत्वात ग्रामपंचायती झेडपी शाळांत शिकणार्‍या पाल्यांच्या पालकांचे घरपट्टी व पाणीपट्टी सारखे कर माफ करण्याचा निर्णय घेत आहेत. झेडपीच्या शिक्षकांनी व शिक्षण विभागानेदेखील शाळा व नोकर्‍या वाचविण्यासाठी तरी चांगले शिक्षण व विद्यार्थी घडविण्याकामी पुढाकार घेण्याची गरज आहे, तसेच घरोघरी जाऊन विद्यार्थी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण तर मिळणार त्यासोबतच घरपट्टी पाणीपट्टी माफ होणार याविषयी आपण माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा

Leave a Comment