WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mofat panipatti gharpatti सरकारी शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी पाणीपट्टी माफ होणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mofat panipatti gharpatti आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील सरकार शाळेत जर तुमच्या मुलाने प्रवेश घेतला तर घरपट्टी पाणीपट्टी माफ होणार आहे हा निर्णय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात घेतण्यात आले आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी पालकांसाठी महत्वाची मोठी बातमी आहे या निर्णयामुळे विद्यार्थी पालकांना काय फायदा होणार आहे कारण घरपट्टी पाणीपट्टी माफ होण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे याचा फायदा काय होईल आणि नेमका कुठल्या विभागात निर्णय घेतलेला आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे बघूयात माहिती.

Mofat panipatti gharpatti संपूर्ण माहिती


राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी महत्वाची मोठी बातमी समोर येत आहे तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल शिक्षण क्षेत्रांमध्ये प्रत्येक ठिकाणी शाळेचे त्याचप्रमाणे कोचिंग क्लासेसचे काही ना काही आश्वासन असतात की आमच्या इथे प्रवेश घ्या तुम्हाला मी मोफत वह्या पुस्तक देऊ मोफत देऊ अशा प्रकारे काहीतरी ते आश्वासन देऊन आपल्या प्रवेश प्रक्रिया घेत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेशाकडे आकर्षण वाढत असतं परंतु तुम्हाला माहिती आहे का आता महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये असा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे का ग्रामपंचायतीने त्याच्यात थेट सांगितलेलं आहे की  त्या गावातील शाळेत जर प्रवेश घेतला तर थेट ग्रामपंचायत ऐतिहासिक आणि क्रांतीकारक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे त्या घरातील पालकांचे घरपट्टी नळपट्टी माफ होणार आहे ऐतिहासिक निर्णय त्यामुळे महाराष्ट्र सर्वत्र जिल्ह्यात या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे त्यामुळे नक्कीच या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या देखील वाढू शकते आणि थोडंसं आर्थिक सहाय्य हे पालकांना देखील मिळू शकतं त्यामुळे त्याचा पैशांचा उपयोग करून ते आपल्या मुलाच्या शिक्षणावर खर्च करू शकतात या मागचा हा उद्देश आहे की कुठल्या जिल्ह्यात कुठल्या ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतलेला आहे.

Mofat panipatti gharpatti मोफत पुस्तके, मोफत गणवेश, मोफत मध्यान्ह आहार, खेळायला भरपूर खेळणी. ना फी ना डोनेशन, तरीही जिल्हा परिषदेच्या शाळेत पाल्याला घालणे पालक टाळू लागल्याने शाळा, वर्ग बंद पडण्याची काही ठिकाणी वेळ आली आहे. आपल्या गावातील शाळा बंद पडणे, पट कमी होणे ग्रामस्थांनाही मनापासून रुचत नाही. त्यामुळेच गावातील शाळा टिकवायचीच, हा निर्धार केलेल्या बावधन (ता. वाई) येथील ग्रामस्थांनी  गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाल्याचा प्रवेश घेणाऱ्या पालकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामसभेत नुकताच घेतला आहे. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

येथील ग्रामपंचायतीची शुक्रवारी (ता. ३०) सरपंच वंदना कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. या सभेत विविद विषयांवर चर्चा झाली; पण काही ग्रामस्थांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा जिव्हाळ्याचा विषय मांडला. गावात आदर्श प्राथमिक शाळा ही पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे; पण शाळेचा दिवसेंदिवस पट कमी होऊ लागला आहे. वाढत्या शैक्षणिक स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिकविणे आव्हान झाले आहे. सध्या अनेक गावांतील जिल्हा परिषदेची शाळा सोडून खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये लाखो रुपये फी भरून पाल्यास पाठवत आहेत.

यामुळे गावागावातील शाळा ओस पडू लागल्या आहेत. वास्तविक, गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांत मोफत प्रवेश, मोफत गणवेश, भोजन मोफत, मोफत पाठ्यपुस्तके आणि उत्तम दर्जाचे शिक्षण मिळते. तरीही पालक आपल्या पाल्यास त्याठिकाणी प्रवेश घेणे टाळतात. बावधन येथेही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही; पण आपल्या गावातील शाळा बंद पडू नये, असे सभेतील सर्वांनाच वाटत होते. त्यामुळे ग्रामसभेत शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची २०२५- २६ या आर्थिक वर्षातील घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा ठराव ग्रामपंचायतीचे उपसरपंच उदयसिंह पिसाळ यांनी मांडला. या ठरावाचे सर्वच ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटाने स्वागत केले. सदस्य संदीप पिसाळ, तानाजी कचरे यांनी त्यास अनुमोदन दिले. ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी आर. व्ही. चव्हाण, सदस्य विवेक भोसले, विजयकुमार रासकर, हणमंत कांबळे, संतोष भोसले, संतोष ननावरे, पृथ्वीराज कचरे, माजी सरपंच पप्पुराजे भोसले, नारायण पिसाळ आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बावधन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असूनसुद्धा ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्याला खासगी आणि महाग शाळेमध्ये प्रवेश घेत आहेत. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली तर कालांतराने या शाळा बंद पडतील. त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना खासगीत शिक्षण घेणे परवडणारे नसल्याने ही पिढी शिक्षणापासून वंचित राहू शकते. याची जाणीव ग्रामीण भागातील पालकांना व्हावी, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.
– उदयसिंह पिसाळ, उपसरपंच

ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णयाचे मी पालक म्हणून स्वागत करतो, तसेच शाळेमध्ये दर महिन्याला पालक सभा घेऊन आपल्या पाल्याची प्रगती शिक्षकांकडून माहिती घेणे प्रत्येक पाल्याचे कर्तव्य आहे. शिक्षणासोबत सर्व विद्यार्थ्यांना कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सहभाग घेण्यासाठी सहकार्य करून त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे शिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे
– अमोल दाभाडे, पालक

अशाप्रकारे आपण पाहिलं की एक क्रांती करण ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान्त होणारच नाही त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी मुळे पालकांचे घरपट्टी नळपट्टी देखील माफ होणार आहे अशा प्रकारची माहिती आपण घेतली आहे आमचे लेटेस्ट अपडेट सरी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

1 thought on “Mofat panipatti gharpatti सरकारी शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी पाणीपट्टी माफ होणार.”

Leave a Comment