WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gharkul Yojana apply घर बांधण्यासाठी सरकारकडून मोफत वाळू मिळणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gharkul Yojana apply आज आपण पाहणार आहोत की राज्य सरकार आपल्याला घर बांधण्यासाठी मोफत वाळू देणार आहे ही मोफत वाळू कोणाला मिळणार आहे कशामुळे मिळणार आहे याचीच माहिती आपण आज या लेखनात घेणार आहोत.

Gharkul Yojana apply पूर्ण माहिती

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घर बांधणे हे त्याचे एक स्वप्न असतं घर बांधण्यासाठी त्याला काहीतरी आर्थिक गरज असते परंतु तुम्हाला माहिती आहे का आता घर बांधण्यासाठी सरकार आता तुम्हाला घरकुल योजना अंतर्गत अनुदान तर देतच आहे परंतु आता त्यानंतर सरकारकडून तुम्हाला आता मोफत वाळू मिळणार आहे आणि मोफत वाळूचा उपयोग करून तुम्ही तुमचं मनातलं स्वप्नातलं घर बांधू शकतात याचीच माहिती आपण घेणार आहोत तर घर बांधण्यासाठी आपल्याला विटा वाळू सिमेंट हे महत्त्वाचं भाग असं माझं तुम्हाल माहित आहे का वाळू ही राज्य सरकारकडून मिळणार आहे त्यामुळे याचा भरपूर फायदा होणार आहे

Gharkul Yojana apply घरकुल बांधणाऱ्या लाखो गरजूंसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारनं त्यांना खूशखबर दिली आहे. घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू (sand ) मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या निर्णयाची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)  यांनी आज दिली. तेसच लवकरच मंत्रीमंडळ बैठकीत वाळूधोरण मांडणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आठवड्यात सर्वसमावेशक वाळू धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार

घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याच्या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्य सरकार या आठवड्यात सर्वसमावेशक वाळू धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार आहे. याबाबत अनेक सूचना जनतेकडून आल्या होत्या, त्यांचा समावेश यामध्ये केला असल्याचे बावनकुळे म्हणाले. अधिकाऱ्यांच्या आजवर आठ बैठका घेण्यात आल्या होत्या. यावेळी बावनकुळे म्हणाले की, राज्यात ज्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत आणि ज्या ठिकाणी पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे, अशा ठिकाणी घाट सुरू करण्याचा निर्णय हे नवीन वाळू धोरण मंजूर झाल्यानंतर घेतला जाणार आहे .

राज्यात एम-सॅन्ड योजना

राज्य सरकार लवकरच एम-सॅन्ड ही योजना आणणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्टोन क्रशरच्या माध्यमातून दगड बारीक करून ही वाळू तयार केली जाईल. त्यामुळे पर्यायी वाळूच्या उपलब्धतेमुळे पारंपरिक नदीतील वाळूची मागणी कमी होईल,असा दावा बावनकुळे यांनी केला.

केंद्रातील एनडीए सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या  (PMAY) माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आर्थिक मदत देऊ केली आहे. त्यानुसार, 1 जून 2015 रोजी सुरू करण्यात आलेली, प्रधानमंत्री आवास योजना सरकारच्या सर्वांसाठी घरे या मिशन अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करुन गरिबांना पक्की घरे (home) देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेत शहरी व ग्रामीण असे दोन वर्ग करण्यात आले असून शहरी भागातील लाभार्थ्यांना 2.30 लाख रुपयांची रक्कम दिली जाते. तर, ग्रामीण भागातील नागरिकांना केवळ 1 लाख 30 हजार रुपयांचा लाभ मिळतो. प्रधानमंत्री अवास योजनेतून घरकुल मंजूर होतात. एका घरकुलाला 1 लाख 60 हजार रुपये सरकारकडून मिळतात, पण तेवढ्या पैशात घरकुल होऊच शकत नाही अशी मागणी अनेकांनी केली आहे. 

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्य सरकारकडून कोणाला मोफत वाळू मिळणार आहे कशामुळे मिळणार आहे याच्यासाठी आपण पूर्ण माहिती घेतली आहे तरी आपण येणाऱ्या प्रत्येक साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाइन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा

Leave a Comment