Cbse board exam आज आपण पाहणार की राज्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षा दोन वेळा होणार आहेत नेमक्या कोणत्या बोर्डाच्या होणारे कोणत्या वेळेत होणार आहेत अशा प्रकारे होणार त्यावेळेस ही माहिती पाहणार आहोत त्यामुळे विद्यार्थी बायकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
Cbse board exam संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे आता दहावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार आहे आता नेमके कोणत्या बोर्डाने हा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला माहिती नवीन एज्युकेशन पॉलिसी काही वर्षांमध्ये लागू होणारे सर्व राज्यांमध्ये आता सीबीएससी बोर्ड जे आहे त्या सीबीएससी बोर्डाने हांडे यांना घेतलेला आहे त्यामुळे त्यांच्या परीक्षा कोणत्या प्रकारे होतात आणि यामध्ये कोणत्या महिन्यात होतील याविषयी माहिती बघूया
Cbse board exam केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता इयत्ता दहावीची वर्षातून दोन वेळा परीक्षा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या निर्णयाबाबत चर्चा चालू होती. मात्र आता याबाबतचा निर्णय सीबीएसईने जाहीर केला आहे. या निर्णयानंतर इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार आहे.
फेब्रुवारी, मे महिन्यात होणार परीक्षा
सीबीएसईने घेतलेला हा निर्णय आगामी वर्षापासून म्हणजेच 2026 सालापासून लागू होणार आहे. फेब्रुवारी आणि मे दोन महिन्यांत इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षा होणार आहे.
परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार?
सीबीएसईने राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचं परीक्षेचं ओझं कमी व्हावं त्यामुळे हे धोरण स्वीकारण्यात आलं आहे. आता या नव्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना दोन वेळा बोर्डाची परीक्षा देता येईल. फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा एप्रिल महिन्यात जाहीर केला जाईल. तर मे महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्यात जाहीर केला जाईल. दुसऱ्या परीक्षेत विद्यार्थी एकूण तीन विषयात आपले गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. या विषयांत विज्ञान, गणित, सोशल सायन्स आणि भाषा विषयांचा समावेश आहे.
वर्षातून एकदाच होणार मूल्यांकन
या निर्णयाअंतर्गत दहावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार असल्या तरी विद्यार्थ्यांच मूल्यांकन मात्र वर्षात एकदाच होणार आहे. सीबीएसईने घेतलेल्या या निर्णयाची थेट अंमलबजावणी होणार नाही. अगोदर सीबीएसई याबाबतचे नियम तयार करेल. त्यानंतर हे नियम जनतेच्या पुढे मांडण्यात येतील. लोकांच्या सूचनांना लक्षात घेऊन नंतरच या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशी होणार?
दरम्यान, सीबीएसईने हा निर्णय घेतला असला तरी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची यावर काय भूमिका असेल. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही या निर्णयाबाबत काय सूर असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी काळात या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार? विद्यार्थी, पालकांना याबबत कसे समजावून सांगितले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या बोर्डाच्या परीक्षा दहावीच्या दोन वेळा होणार आहे त्याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा