Ration card update आज आपण पाहणार आहोत की राज्यातील राशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे कोणत्या नागरिकांचे राशन कार्ड रद्द होणार आणि कशामुळे रद्द होणार याविषयी आपण माहिती बघणार आहोत महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे अन्न प्रशासन विभागाच्या बघुयात पूर्ण माहिती
Ration card update संपूर्ण माहिती
राशन कार्ड आपला सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे कारण राशन कार्डवर आपल्याला मोफत अन्नधान्य तर मिळतं परंतु त्यासोबतच आपल्याला एक ओळखपत्र देखील राशन कार्ड आहे कारण भरपूर ठिकाणी आपल्याला राशन कार्ड ची गरज असते सरकारी योजना असतील काही त्याचप्रमाणे आपल्याला मेडिकल बेनिफिट देखील रक्षण कडून मिळत असतात सरकारी योजनेबरोबर त्याचप्रमाणे आणखीन काही आपल्याला कुठे कागदपत्र गव्हर्मेंट काढायचे असेल तरी आपल्याला राशन कार्ड चे महत्व आहे रेशन कार्ड तर कोणाचे रद्द होणार याविषयी आपण पाहू संपूर्ण माहिती
Ration card update महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर सूचना समोर आली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून मिळणारे मोफत धान्य जर अवैधरित्या विक्री करताना कोणी आढळले, तर त्यांचे रेशन कार्ड थेट रद्द करण्यात येणार आहे. अकोल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी यासंदर्भात इशारा दिला आहे.
राज्यात 7 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना शिधावाटप दुकानांमार्फत स्वस्त धान्य पुरवले जाते. परंतु, काही रेशन कार्ड धारक मिळालेलं धान्य व्यापाऱ्यांना विकत असल्याचे तक्रारीतून उघड झालं आहे. हे अत्यंत गंभीर आहे, कारण सार्वजनिक वितरण प्रणालीचा हेतू गरजू कुटुंबांपर्यंत अन्न पोहोचवणे हा असून, त्याचा व्यावसायिक गैरवापर निषेधार्ह आहे.
काय होणार नियमभंग केल्यास? :
– शिधापत्रिकाधारक जर मोफत धान्य विकताना आढळले, तर त्या कुटुंबाचे नाव लाभार्थी यादीतून काढले जाईल.
– संबंधिताचे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल.
– धान्याची अवैध साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील
– हे नियम राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत लागू असलेल्या अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांच्यावर लागू होतील.
जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकत्र वाटप करण्यात येत आहे, कारण पावसाळ्यात अडचणी येऊ शकतात. पात्र लाभार्थ्यांना मिळणारे धान्य:
– अंत्योदय योजनेत: 35 किलो (गहू व तांदूळ) — दर: ₹2–₹3 प्रति किलो
– प्राधान्य कुटुंब योजनेत: प्रतिमाणसी 3 किलो गहू + 2 किलो तांदूळ — दर: ₹2–₹3 प्रति किलो
– प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना: प्रतिमाणसी 5 किलो अन्नधान्य (पूर्णतः मोफत) + दरमहा एक किलो डाळ (तूर किंवा चणाडाळ)
शिधापत्रिका धारकांनी मिळालेलं धान्य स्वतःच्या कुटुंबाच्या वापरासाठीच वापरावं. ते विकल्यास नुकसान फक्त स्वतःलाच होणार आहे. तसेच, शासनाच्या योजनेचा गैरवापर झाल्यास इतर गरजू कुटुंबांचा हक्क हिरावला जाईल, हेही लक्षात ठेवा.
अशाप्रकारे आपण पहिले राज्यातील कोणत्या नागरिकांचे रेशनकट रद्द होणार याविषयी माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अध्यक्ष साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा