SSC HSC IMP Questions 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची एक बातमी राज्यातून समोर येत आहे ती धक्कादायिक बातमी कुठली आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे अशी एकदा एक बातमी राज्यात घडली आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
SSC HSC IMP Questions 2025 पूर्ण माहिती
राज्यात दहावी बारावी बोर्डाचे पेपर सुरू झालेले आहेत यामध्ये जातात बारावी बोर्डाच्या पेपरमध् काही धक्कादाय घटना घडलेल्या आहेत या धक्कादायक घटनांमुळे दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्याबाबत आता शिक्षकांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे जर कठोर कारवाई झाली नाही तर शिक्षक हे परीक्षांवर बहिष्कार देखील टाकू शकतात याबाबत एक सर्वात मोठी बातमी आलेली आहे याची पूर्ण बातमी विश्लेषित आपण पाहूयात
बोर्डाचे कॉपीमुक्त अभियान
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा घेण्यासाठी यावर्षी बोर्डाने काही कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे शिक्षकांना पर्यवेक्षकांना संचालक जे असतील त्यांना सर्वांना सांगितलेला आहे की यावर्षी ज्या ठिकाणी कॉपी करतील गैरप्रकार घडतील त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येणार आहे या संदर्भात प्रत्यक्ष कॉलेज जे काही केंद्र आहेत या नियमांचे पालन करताना दिसत आहे परंतु या नियमाचा पालक करत असताना आता कॉप्या वगैरे गैरप्रकार होत नाहीये त्यामुळे विद्यार्थी काय काय अशा प्रकारच्या घटना करत आहेत की त्यामुळे शिक्षकांच्या मनामध्ये आता भीती निर्माण झालेली आहे
बारावीच्या बोर्ड परीक्षांना प्रारंभ झाले असून, यामध्ये पहिल्याच पेपरदरम्यान मंगळवारी (दि.11 फेब्रुवारी) एक गंभीर घटना घडली आहे. श्री वृद्धेश्वर हायस्कूल, तिसगाव (ता. पाथर्डी) येथे एक गुंडाने पर्यवेक्षकाला चाकूचा धाक दाखवून दमदाटी केली आहे. या घटनेचा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निषेध नोंदवून, जबाबदारीवर असलेल्या शिक्षकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने पाथर्डीचे तहसीलदार उध्दव नाईक व पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर संतोष मुटकुळे यांना निवेदन दिले. यावेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, अशोक दौंड, डी.सी. फकीर, सुभाष भागवत, भारत गाडेकर, आसिफ पठाण, महिंद्र राजगुरू, आत्माराम दहिफळे, बापूसाहेब कल्हापूरे, एस.आर. पालवे, व्ही.व्ही. इंगळे, सुभाष भागवत, अजय भंडारी, समाधान आराक, सुरेश मिसाळ, छबुराव फुंदे, सी.एम. कर्डिले, एन.एस. मुथा, मच्छिंद्र बाचकर, सुधाकर सातपुते, डॉ. अनिल पानखडे, अजय शिरसाठ, व्ही.पी. गांधी आदी उपस्थित होते.
बारावी बोर्डाच्या पहिल्याच पेपरला शिक्षकांना धमकाविण्याचा प्रकार घडला असताना, शिक्षिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. पेपर संपल्यानंतर काही गुंडांनी पेपर जमा करणाऱ्या शिक्षकाची गाडी अडवून त्यांना गाडीच्या बाहेर ओढून शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हंटले आहे.
यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षकांची सरमिसळ पद्धतीने नियुक्ती केली आहे. त्यामुळे ओळख नसलेल्या आणि दूरवर असलेल्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेने शासनाकडे शिक्षकांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच, अशा घटना सातत्याने घडत राहिल्यास, इयत्ता, दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील शाळांमध्ये सरमिसळ पद्धत
सरमिसळ पद्धतीने अनोळखी शाळेत शिक्षक परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी जात आहे. तेथील परिस्थिती व ओळख नसल्याने गाव गुंडांकडून त्यांना धमकाविण्याचे प्रकार घडत आहे. अशा प्रकारामुळे शिक्षकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, काही गंभीर प्रकार घडण्या अगोदरच प्रशासनाने त्यांना संरक्षण द्यावे. अन्यथा बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला जाणार आहे. – आप्पासाहेब शिंदे (अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघटना)
अशाप्रकारे आपण पहिला की दहाव बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत या संदर्भात एक धक्कादायक एक बातमी आली आहे याचीच माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
