Goverment new schemes 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील बेरोजगार तरुणांना महिन्याला आठ हजार रुपये कसे मिळण्यात कोणाला मिळणार त्यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण घेणार आहोत
Goverment new schemes 2025 पूर्ण माहिती
प्रत्येक जण आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या नोकरीच्या शोधात असतो बऱ्याच जणांन यामध्ये नोकरी मिळते काही जणांना नोकरी मिळत नाही तर ज्या व्यक्तींना नोकरी मिळेल नाही अशा व्यक्तींसाठी एक आनंदाचे बातमी समोर येत आहे त्यांना आता राज्य सरकारकडून महिन्याला एक भत्ता मिळणार आहे आणि हा भत्ता जवळपास एक दोन हजार नाही तर हा जवळपास आठ ते बारा हजार पर्यंत तुम्हाला हा भत्ता मिळू शकतो ज्या व्यक्तीला नोकरी नसेल अशा व्यक्तींना राज्य सरकार आता एवढे पैसे देणार आहे तर बघुयात संपूर्ण विश्लेषक माहिती
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून नोकरी इच्छुक अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
उमेदवारांनी नोंदणी कुठे करायची
या योजनेचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोदणी करावी. प्रत्येक तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित शिबीरातही नोंदणी करता येईल. नोंदणीकृत उमेदवारांना शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमधील रिक्त जागेकरीता योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी महास्वयंम संकेतस्थळावर ‘सीएमवायकेपीवाय ट्रेनिंग स्कीम’ अंतर्गत असलेल्या जाहिरातींकरीता ऑनलाईन अर्ज करावे.
या योजनेचा लाभ घेण्याकरीता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी तसेच वय किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे. तो १२ वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेला असावा. उमेदवाराचे आधार नोंदणी असावी व उमेदवाराचे आधार संलग्न बॅंक खाते असावे.
राज्यातील बेरोजगार तरुण असतील व तो आयटीआय पास असेल ग्रॅज्युएशन असेल बारावी उत्तीर्ण असेल अशा विद्यार्थ्यांना नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक ठराविक कंपनीमध्ये जॉब ऑफर केला जाईल आणि यामध्ये तुम्हाला इंटरशिप देऊन तुम्हाला राज्य सरकारकडून त्याचा फायदा मिळणार आहे म्हणजे तुम्ही प्रशिक्षणही घेऊ शकता आणि त्यानंतर पैसे देखील तुम्हाला मिळणार आहे
कोणत्या विद्यार्थ्यांना किती लाभ मिळणार
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी हा सहा महिन्याचा राहणार असून उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना प्रतिमाह ६ हजार रुपये, आयटीआय, पदविकाधारकांना ८ हजार रुपये, पदवीधर उमेदवारांना १० हजार रुपये विद्यावेतन शासनामार्फत थेट उमेदवारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उद्योग, स्टार्टअप, शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी ऑनलाईन पद्धतीने रिक्तपदे नोंदविलेली आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, वस्तू व सेवा कर विभाग, सह-आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था अशा विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, उपक्रमांसह बीव्हीजी इंडिया लि., एस. के. कॉर्पोरेशन अशा अनेक खाजगी आस्थापनांचा समावेश करण्यात आला आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील बेरोजगार तरुणांना कशाप्रकारे महिन्याला आठ ते 12 हजार रुपये पर्यंत पैसे मिळतील या विषयाची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा