PM SWANIDHI केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली पंतप्रधान स्वनिधी योजना ही देशातील लहान व्यापारी, फेरीवाले आणि लघु उद्योजकांसाठी महत्त्वाची ठरली आहे. या योजनेतून नागरिकांना ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते, तेही कोणत्याही हमीशिवाय. अल्पभूधारक व लहान व्यवसायिकांना स्वावलंबी करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
किती मिळेल कर्ज
या योजनेत प्रथम टप्प्यात अर्जदाराला १०,००० रुपयांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज वेळेत परत केल्यास पुढील वेळी दुप्पट रक्कम कर्ज म्हणून घेता येते. या पद्धतीने टप्प्याटप्प्याने कर्जाची मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढू शकते.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
या योजनेत कर्जावर व्याजदर कमी असून काही अटी पूर्ण केल्यास व्याजमाफीची सुविधाही मिळू शकते.
कोणताही गॅरंटर आवश्यक नाही.
कॅशबॅक व डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळते.
सरकारने या योजनेच्या बजेटमध्ये वाढ करून अधिकाधिक रस्त्यावरील विक्रेत्यांना यात सहभागी केले आहे.
कोण घेऊ शकतो या योजनेचा लाभ
कोणताही लहान व्यापारी, फेरीवाला किंवा लघु उद्योगपती ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे आणि व्यवसाय चालू आहे किंवा सुरु करायचा आहे, तो अर्ज करू शकतो.
व्यक्तीचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
पॅन कार्ड, ओळखपत्र व व्यवसायाची माहिती देणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्जदाराने आपल्या जवळच्या सरकारी बँकेत जाऊन अर्ज करावा.
बँकेतून अर्ज घेऊन आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.
फॉर्म तपासून सर्व काही योग्य असल्यास कर्ज मंजूर केले जाते आणि थेट खात्यात रक्कम जमा केली जाते.
सध्या ही प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने केली जाते.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड आणि ओळखपत्र
पॅन कार्ड
बँकेत खाते असणे आवश्यक
व्यवसायाची माहिती व उत्पन्नाचा स्रोत
महत्त्वाची सूचना
वरील माहिती ही उपलब्ध सरकारी तपशीलांवर आधारित आहे. योजनेच्या अटी, पात्रता व व्याजदर वेळोवेळी बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळ किंवा जवळच्या बँकेत अद्ययावत माहिती तपासणे आवश्यक आहे
